Thursday, June 16, 2011

रखवालदार ते 'सोनेरी' आमदार... रमेश वांजळे



रमेश वांजळे यांचे मूळ गाव अहिरे. गावातच त्यांचे लहानपण गेले. तीन भावंडांमधील वांजळे हे थोरले. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. त्य

ातच वडील सरपंच असल्याने राजकारणाचे बाळकडू घरातून मिळाले. घरची परिस्थिती चांगली असल्याने त्यांनी काही काळ तालीम केली. शरीरसौष्ठव चांगले असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेत त्यांना रखवालदार म्हणून नोकरी मिळाली. वाकड येथील स्मशानभूमीत त्यांनी काही काळ रखवालदार म्हणून नोकरी केली. परंतु ही नोकरी फार काळ टिकू शकली नाही. वांजळे यांना रामकृष्ण मोरे यांच्या रूपात राजकीय गुरू मिळाले. मोरे यांच्यासमवेत काम करीत त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि ते प्रथम अहिरे गावचे सरपंच झाले. या सरपंचपदातून त्यांनी राजकीय धडे घेत झेप घेतली. हवेली पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसकडून ते विजयी झाले. एवढेच नव्हे, तर पंचायत समितीचे उपसभापतिपद त्यांनी मिळविले. राजकीय वाटचालीत माघार घ्यायची नाही, ही त्यांची वृत्ती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वांजळे यांचा गट महिलांसाठी आरक्षित झाला. हा गट आरक्षित झाल्यावर त्यांनी आपली पत्नी हर्षदा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या.

जिल्हा परिषदेत पत्नी निवडणूक आल्यावर त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून काम करणे पसंत केले. याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यामुळे त्यांना अन्य पक्षांकडे धाव घ्यावी लागली. त्यांनी 'राष्ट्रवादी'कडे उमेदवारी मागितली. पण 'राष्ट्रवादी'ने उमेदवारी दिली नाही; त्यानंतर भाजप-शिवसेनेकडे त्यांनी तिकिटाची मागणी केली. मात्र, त्यांच्याकडूनही तिकीट न मिळाल्याने वांजळे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी मागितली. ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि त्याच वेळेपासून वांजळे हे हमखास आमदार होणार, अशी चर्चा सुरू झाली. प्रचाराची आगळीवेगळी पद्धत, गळ्यातील आठशे ग्रॅम सोने, कार्यर्कत्यांचे मोठे जाळे आणि उत्कृष्ट भाषणशैली यामुळे त्यांची मोठी छाप मतदारांवर पडली. एखाद्या हिंदी चित्रपटातील खलनायक भासावा अशी त्यांची यष्टी. डोळ्यांवर गॉगल, दाढी वाढलेली आणि अंगभर सोने यामुळे त्यांच्यावर टीका केली गेली. परंतु वांजळे यांनी आपल्या वाणीने विरोधकांवर मात केली. संत तुकारामांचे मुखोद्गत अभंग, ज्ञानेश्वरांच्या ओव्या ते भाषणात म्हणून दाखवीत आणि त्यांची छाप आणखी गडद होत गेली. त्यामुळे त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना वांजळे दगडूशेठ मंदिरात बसून होते. निकाल कळाल्यावरच ते मंदिरातून बाहेर पडले.

अंगावर मिरविणाऱ्या सोन्यामुळे अगदी आमदारकीच्या निवडणुकीच्या प्रचारापासूनच वांजळे चचेर्त राहिले होते. तमाम 'वृत्तवाहिन्यां'नी त्यांना गोल्डमॅनचा 'किताब' बहाल करून टाकला होता. विधिमंडळापासून कोणत्याही सभा-समारंभांमध्ये वांजळे उपस्थित झाले, की बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांपासून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या अंगावरील सोने न्याहाळत. तसेच, त्यांच्यासमवेत छबी टिपण्यासाठी मोबाईल कॅमेरे सरसावत.

विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मात्र या 'गोल्डमॅन'चे विक्राळ रूप उभ्या महाराष्ट्राने पाहिले होते. अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात 'मनसे'ने केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विधिमंडळात पक्षाचे आमदार घोषणाबाजी करीत होते. त्या वेळी आझमी यांच्यासमोरील माईकचे पोडियम उखडून टाकतानाचे वांजळेही मराठी जनतेने पाहिले.

आमदार झाल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी वांजळे यांचा विजयी जल्लोष काही औरच होता. आपली पत्नी हर्षदा हिला चक्क उचलून त्यांनी आपली पहिलीवहिली आमदारकी साजरी केली होती. वांजळेंच्या या सेलिब्रेशनची खबर मिळताच उशिराने दाखल झालेले कॅमेरे-वाहिन्यांसाठी त्यांनी या जल्लोषाचा 'रीटेक'ही केला.

गेल्या काही दिवसांपासून 'आमदार आपल्या दारी' या योजनेच्या निमित्ताने ते आपला खडकवासला मतदारसंघ पिंजून काढत होते.

व्यवसायातून आर्थिकवृद्धी... काशीदर्शन यात्रा

रमेश वांजळे यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये मोठा दबदबा. लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांचे अत्यंत चांगले संबंध. त्यातूनच एनडीएमध्ये ज्यूसबार सुरू करण्यास त्यांना परवानगी मिळाली. हाच ज्यूसबार त्यांच्या उत्पन्नाचा व आथिर्क उन्नतीचा मोठा मार्ग ठरला. दररोज मंडईतून ट्रकभर फळे आणायची. त्याचा ज्यूस करायचा आणि एनडीएतील छात्रांना विकायचा. कित्येक वर्षे त्यांनी हा ज्यूसबारचा व्यवसाय सांभाळला. त्यांचा लहान भाऊ शुक्राचार्य वांजळे आता हा ज्यूसबार सांभाळतो. या व्यवसायातून मिळालेला पैसा वांजळे यांनी जमिनीत गुंतविला. जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून त्यांनी संपत्ती मिळविली. मात्र, ही संपत्ती घरात न ठेवता त्यांनी गरीब, शेतकरी व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना काशीयात्रा घडविण्याची योजना सुरू केली. त्यांनी स्वखर्चाने हजारो नागरिकांना काशीयात्रा घडविली; तसेच दलित समाजाला दीक्षाभूमीचे दर्शन, तर मुस्लिम समाजाला अजमेरची यात्रा त्यांनी घडविली

Friday, June 10, 2011

आठवतय.........????



आठवतय, आपण दोखे एकत्र असताना,
आपण केलिली प्रेमाची साठवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
कशी काय येणार नाही त्या दिवसांची आठवण...
आठवतय, आपण दोखे घरात एकत्र असताना,
त्या एकांतात मी तुझा घेतलेला चुंबन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
उजाड़ दिसत आहे माझ्या घरच आंगन...

आठवतय, आपण दोखे गोड स्वप्न रंगवत असताना,
ठरवले होते प्रेमळ आयुष्याचे पुढचे क्षण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझे आयुष्यच झाले आहे अता निर्जन...

आठवतय, मला जोराची भूक लागली असताना....
तू अगदी प्रेमाने भरवले होतेस मला जेवण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
मी अता काहीही करत नाही कसले सेवन...

आठवतय, आपण दोखे खरेदी करत असताना,
आपले एकमेकांवर असलेले प्रेमच होते खरे धन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझ्याच नावाने साजरे करतो मी प्रत्येक सण...

आठवतय, मी माझ्या दुखात रडत असताना,
तू उघडलेस माझ्यासाथी आपल्या प्रेमाचे आलिंगन...
तू आज माझ्या सोबत नसताना,
सुखात सुद्धा मी करत आहे स्वतःशीच भांडण...

आठवतय, आपण कुठे ही भेटत असताना...
फ़क्त प्रेमाचच बोलायचो आपण काही पण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
माझ ते बोलन संपल नाही आहे अजून पण....

आठवतय, आपले प्रेम कठिन परिस्थिति असताना,
दोखानी मिळून घेतले होते अमर प्रेमाचे प्रण....
तू आज माझ्या सोबत नसताना,
हताश होऊंन घेतले मी एका कोपरयाचे शरण...

आठवतय, आपण दोखे एकमेकाना भेटत असताना,
फ़क्त आपले प्रेम आणि दोखे आपण...
तू आज माझ्या सोबत नसताना,
शत्रु वाटतात मला अता प्रत्तेक जन...

आठवतय, आपण दोखे लांब एकमेकांपासून असताना...
जगन कठिन झाले होते हे प्रेमाचे जीवन..
तू आज माझ्या सोबत नसताना,
तुझी आठवणच झाले आहे माझे सहजीवन...

चेह~यावर रेशमी बटा रुळती का इतकी सुंदर दिसते ती?...


चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर दिसते ती

किति गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?

भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखिची का वाटते ती ?

नाहि जरी दोन शब्द बोललो मी
अनामीक ओढ का लावते ती?

खुप गुढ वागणे आहे तिचे जरी...
तरी मैत्रीण का आवडे मला ती?

आयुष्य



"या छोट्याश्या आयुष्यात ठरवलच तर खुप काही करता येत....

नाही जमलच जर काही,

तर तुमच्या सर्वांसारख तेच तेच करुण रोज तिरडी बदलून नव्यान मरता येत.

ठरवलच तर माझ्यासारख हे आयुष्य रोज नव्या रंगांनी भरता येत....

नाहीतर तुमच्यासारख,

कुणाची तरी आठवन काढून इवलुश्या दोन डोळयांमधे तुडूम्ब भरता येत.

ठरवलच माझ्यासारख मनापासून मनातल्या आठवणीमधे झुरता येत....

तुमच्या सर्वांपासून दूर जाण्यासाठी,

मला अस शब्दांच्या खड्ड्यात खोल खोल स्वतःला सहज पुरता येत.

जिंकलेल्या डावाचा आनंद मला पावसाच्या थेम्बासारखा एकट्यानेच झेलता येतो...

एरवी तुम्ही नाही जमणार म्हणून,

सोडलेला डाव मला जिंकन्यासाठीच पुन्हा पुन्हा खेळता येतो.

हे असच माझाही आयुष्य पाण्याच्या थेम्बासारख खळखळत वाहत रहात....

माझ्या शब्दांमधे तुम्हीही रमलात म्हणून,

गालात हसून तुमच्या सर्वांकड़े पाहत रहात...."

असं प्रेम करावं........................



थोड सांगाव थोड लपवावं,
असं प्रेम करावं.
थोड रुसावं थोड हसावं,
असं प्रेम करावं.
गपचूप गपचूप फोनवर बोलाव,
कोणाची नझर पडताच पटकन "अग" चा "अरे" कारावं.
असं प्रेम करावं.

ती वेळेवर आली तरी,
आपण जाणून बुजून उशीरच जाव.
तिचा खोटा रुसवा घालवण्यासाठी मग,
तिच्या कानाजवळ जाऊन SORRY म्हनाव.
असं प्रेम करावं.

वरवर तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर,
खूप हसून घ्याव.
"तू मला खूप आवडतेस"
हे मात्र तिला प्रत्येक वेळी सांगाव.
असं प्रेम करावं.

प्रेम हि एक सुंदर भावना,
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.

विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.

कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................

.... मला पुन्हा शाळेत जायचय …..



शाळेचे ते दिवस आठवले की …

उगीचच मोठं झाल्यासारखं वाटतं ….

bus -stop ची मागची ती शाळा पाहून ,

पुन्हा शाळेत जावसं वाटतं ….

शाळा आमची छान होती …

Last bench वर आमची team होती ….

Cricket च्या वेळी ground वर cheating व्हायची …

आणि मधल्या सुट्टीत कॅन्टीन मधल्या वडा-पाव साठी ….

साला नेहमीच line असायची …

जन-गण-मन ला कधी कधी ..

शाळे बाहेर सुद्धा उभे रहायचो …

प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू देऊनही ….

प्रतिज्ञा म्हणायचो …

प्रार्थनेच्या वेळी मात्र …. सगळ्यांसारखे …

नुसतेच ओठ हालवायचो ….

पावसाळ्यात शाळेत जाताना ,

छत्री दप्तरात ठेऊन …. मुद्दामच भिजत जायचं …

पुस्तक भिजू नये म्हणून ….

त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….

शाळेतून येता येता … एखाद्या डबक्यात उडी मारून …

उगीचच सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवायचं ….

Black -board वर बोलणार्या मुलांमध्ये ….

Monitor नेहमीच आमचं नाव लिहायचा …

नेहमीच्याच incomplete गृपाठामुळे …

हातावर duster चा व्रण असायचा ….

प्रयेत्येक Off -period ला P.T. साठी ….

आमचा आरडाओरडा असायचा …

शाळेतून घरी येताना शाळेबाहेरचा ….

तो बर्फाचा गोळा संपवायचा ….

मुलीं बरोबर कितीही बोललो तरीही ….

कधी कोणी link नाही लावायचं …

प्रत्येक महिन्यातून एकदातरी …

डोक्यावरचे केस कापायचो …

आणि आज-काल सारख्या प्रत्येक वाक्यात ….

शिव्या सूद्धा नाही द्यायचो …

इतिहासात वाटतं …. होता शाहिस्तेखान …

नागरिक शास्त्रात पंतप्रधान ….

गणित… भुमितीत होतं … पायथागोरस च प्रमेय …

भूगोलात वाहायचे वारे …. नैऋत्य … मॉन्सून …

का कुठलेतरी … वायव्य….

हिंदीतली आठवते ती “चिंटी कि आत्मकथा”

English मधल्या grammar नेच झाली होती आमची व्यथा …

शाळेतल्या gathering चा dance …

बसल्या बसल्या झोपान्यासाठीचा … तो मराठी चा तास ….

दरवर्षी नवीन भेटायचे ….

Uniforms आणि वह्या पुस्तकांचा set …..

पण नवीन दप्तरासाठी नेहमीच करावा लागायचा wait ….

शाळा म्हटली कि अजूनही आठवतात ….

desk वर pen ने त्या “pen fights” खेळणं ….

exams मधल्या … रिकाम्या जागा भरणं … आणि जोड्या जुळवणं …

चिखलातल्या त्या football च्या matches …

कबड्डीत … पडून धडपडून ….

हातापायांवर आलेले scraches …

खरच कंटाळा आलाय या मोठेपणाचा ….

मला पुन्हा लहान व्हायचं ….

हसायचं …. खेळायचं ….

मला पुन्हा शाळेत जायचं ….

.
««««««««««««««««« N »»»»»»»»»»»»»»»»»»»

कोण म्हणतं आमच्या घरात


कोण म्हणतं आमच्या घरात
माझं काही चालत नाही?
गरम पाणी मिळाल्याशिवाय
मी भांड्यांना हात लावत नाही!

तसे घरातले सगळेच निर्णय
बायको माझ्यावरच सोपवते
धुणं केंव्हा, भांडी केंव्हा
माझं मला ठरवू देते!

मीही माझ्या स्वातंत्र्याचा
पुरेपुर फायदा घेतो
आधी स्वैपाक करून घेतो
धुणं भांडी मागून करतो...

रहाता राहिली केर-फरशी
आणि आवरा आवर
तेही पटापट करून टाकतो
बाकीची कामं झाल्यावर...

आता विचाराल 'तुमची बायको
घरात काहीच काम करत नाही?'
अहो, असं काय करता
ती माझ्यापासून स्वतःला वेगळं असं धरत नाही!

तिनं केलं काय, मी केलं काय
सगळं एकच असतं
दोघांत भेद करायला जातं
तिथेच जग फसतं!!

बायको नावाचं वादळ



तुम्ही घरात शिरता तेंव्हा
सारं शांत शांत असतं
चपला जागेवर, पेपर टिपॉयवर
सारं जागच्या जागी असतं
सोफ्यावरती बसून राहून
हातामधे रिमोट घेऊन
बायको नावाचं वादळ
पहात असत तुमची वाट

बायको जेंव्हा बोलत असते



बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

पुन्हा ढग दाटून येतात



पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात

पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला

पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो

पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी

.

हर्ष मानसी हिरवल दाटे चोहिकडे – ( बालकवी )



श्रावणमासी हर्ष मानसी हिरवल दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!

वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो उघडे;
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे!

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा!
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते!

फडफडा करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती;
सुंदरा हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती!

खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे,
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे!

सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला
पारीजातही बघता भामारोष भामारोष मनीचा मावळला!

सुंदर परडी घेऊनी हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदरबाला या फुलमाला रम्य फुले, पत्री खुडती!

देवदर्शना निघती ललजा, हर्ष माझ्या ह्रदयात!
वदनी त्याच्या वाचुन घ्यावे श्रावण महिन्याचे गीत!

* ** अपमानाच दलदल ***



आयुष्य सरत चाललय
ओल्या जखमां घेऊन
अपमानाच दलदल
बदल्याची भावना घेऊन

तुझ्याच हातात आहे
अभिमानाचा लगाम
सुकलेल्या खपल्या
उकरण कीवां फ़ुकंर घालून
सुकवण.
तुझ्याच हातात आहे……

अपमान चिघळत बसण
नेहमीच कठीण जात
तो गिळून टाकावा…..
अन द्यावा ढेकर,
निरागसतेचा…….

मी खर सांगू …..
तुझं माझ काही जात नाही
इथे हरवतात ते फ़क्त क्षण
हवा असतो तुझा हसरा सहवास.
आणी सोबत….तु पण

पण तुझ्यात असते ओढ
बदल्याची ……..
चोविस तास वेळ तुझ्या
खटल्याची …….

उब आलाय आता मला
तुझ्या अस्तिव्ताच्या धड्यांचा
मी शून्य होऊन जगलोच ना
कधी केला का प्रश्न या बेड्यांचा ?

मी स्वीकारत आलोय तुला
तुझ्या अहंकारा सकट
पण आज कळतय
सगळच जातय फ़ुकट…..

-

मी बरसलो आज शब्दांतुन

मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

- सुरेश भट्ट...

उघडीप...........



आज बऱ्याच दिवसानंतर जरा उघडीप मिळाली..
पाऊस थांबला..
मन वेगळ्या दिशेनी धावू लागलं..
पण...
पळता पळता थोडी काळजी घ्यावी लागते..
कधी कधी ठेच लागते..
आणि जेव्हा आपणच सगळ्यात पुढे असतो.. तेव्हा तर शहाणंही स्वतःलाच व्हावं लागतं..
आज रस्त्यांवरून जाताना जाणवलं...
पाऊस पडून गेल्यामुळे रस्त्याला सुद्धा किती जखमा झाल्या आहेत..
आजच्या उघडिपीमुळे त्या जरा कोरड्या पडल्या आहेत..
ओल्या जखमा कधीच बऱ्या होत नाहीत.. आणि कायम ठसठसत राहतात..
रस्त्यांना पण या जखमा अशाच ठसठसत असतील का??
पाणी साचलेल्या जखमांवरून वाहनं जोरात जातात..
पाणी उडवतात... रस्ता तेवढ्या भागात मोकळा होतो.. सालपट निघतं..
पावसानी उघडीप दिली तरी तो जखमा मागे ठेवून जातो..
उन्मळून पडलेली झाडं, ती सुद्धा पावसाच्या आणि बेभान सुटलेल्या वाऱ्याच्या विरोधात जातात आणि पाऊस त्यांना कायमची जखम देऊन जातो..
ती फक्त झाडं नसतात.. त्यावर कोणाचं तरी घरट असतं.. कोणाची तरी ढोली असते..
ते घर आता आपल्यासाठी नाही हे feeling प्राणी आणि पक्ष्यांना आल्यावर त्यांना कसं वाटत असेल..?
उघडिपीनंतर ते ही नवीन जोमानी कामाला लागतील?? का डोक्याला हात लावून बसतील..???
अशी ही उघडीप....
हवीहवीशी.. कधी कधी नको नकोशी..

ह्र्दयात नकार होते (गझल)


तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

मैत्रीच्या पावसात


काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
“काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!!

पाऊस असा रुणझूणता


पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली …

ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता
[ पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा ]
..

नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..

सखे..

सखे..
ढग दाटून आले की मला तुझी आठवण येते..
विजांचा कडकडाट झाला की मला तुझीच आठवण येते..
जोरात पाऊस आला की मला फक्त तुझीच आठवण येते..

कारण माझी छत्री तुझ्याकडे आहे... प्लीज ती परत कर..!! :D

मी अन एक friend (मुलगी)

♫ मी अन एक friend (मुलगी) chatting करत होतो..

मी : hmm ...(कारण मला बोर झालेलं)
ती : hmmmm ...(माझ बघून....मुद्दाम)
मी : hmmmmmm ....
ती : hmmmmmmmmm........
मी : hmmmmmmmmm....
ती : hmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm,,,,,

मी:एवढा मोठा "hmmm".... माणूस म्हणाव कि म्हैस.

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने



प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली… तनाच्या… मनाच्या
नकोसे शुभारंभ ध्येया – भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या…

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास
उरा – अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा… किंवा तो ही भास!!!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा



^^^^<<< * **** *** >>>^^^^^