Friday, August 19, 2011

charolya



जरी चालशी चोरट्या पावलांनी

तुझ्या चाहुलीने असा कंप होतो,

मनी गांगरावे, न काही सुचावे

दिसेना तरीही तुझा भास होतो..











तुझे गाल गोरे, परी त्यावरीची

खळी का असे हीच तक्रार आहे,

खिळूनी बसे दृष्टि तेथे पुन: ती

ढळेना म्हणूनीच बेजार आहे....








नसे लक्ष माझे तसे वेधण्याला

उगा येरझाऱ्या कशी मारते तू ?

कधी एकटी पाहुनी मी खुणावी

बहाणा नवा शोधुनी टाळते तू..








पावसाच्या धारा सख्या , मला बघ चिडवतात

तू बरोबर नसल्याची आठवण करून देतात

तू सोबत असताना ,मला त्यांना chidvaychay

मला मात्र वेगळ्या पावसात भिजायचय !!!!!!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment